Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवसाढवळ्या कोयत्याने सपासप वार करून बारावीतील विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

Webdunia
सोमवार, 24 जानेवारी 2022 (10:02 IST)
लातूर : दिवसाढवळ्या एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातीलचं विशाल नगर परिसरात एका महाविद्यालयीन तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करताना आरोपीने कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल सुरेश उजळंबे असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
अज्ञात मारेकऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. रविवार दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
 
लातूर शहरातील अत्यंत गजबजलेला भाग असलेल्या विशाल नगर परिसरात काही अज्ञात मारेकऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत खून केला.
 
पोलिसांनी गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 
 
संबंधित तरुणावर कोणी हा हल्ला केला आहे तसेच यामागील कारण काय याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल नगर परिसरातील साई मंदिरा शेजारील चौकात हा हल्ला झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments