Festival Posters

दोन ठार, औरंगाबादेत नेट बंद, अफवा पासरवाल तर तुमची खैर नाही

Webdunia
शनिवार, 12 मे 2018 (15:10 IST)

किरकोळ करणातून झालेल्या दंगलीचे औरगाबाद येथे मोठे पडसाद उमटले आहे. दोन गटाच्या भांडणातून उसळलेला हिंसाचार नियंत्रणात आला आहे. या हिंसाचारात  40 जण जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. काल  रात्री साडे अकरा वाजता उसळलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी  नियंत्रण मिळवल आहे. मात्र हिंसाचार ग्रस्त भागात शंभर ते दीडशे गाड्या आणि चारशे ते साडे चारशे दुकानांना आगी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वातावरण अजूनही तापले आहे.  दोन गटात झालेल्या दगडफेकीत 35 ते 40 जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून काही भागात संचारबंदी आहे. आणि पूर्ण औरंगाबादमधलं इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मात्र जर का अफवा पसरवली तर मग पोलिस कठोर कारवाई  करतील असा इशारा दिला आहे.  आय घटनेत जखमींमध्ये एका एसीपीचा समावेश आहे. हिंसाचार ग्रस्त भागात एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करा, असं नम्र आवाहन वेब दुनिया करत आहे. कारण आता हिंसाचार थांबला असून, पोलिस कारवाई करत आहे.मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री राडा झाला होता. काही लोकांच्या चुकीमुळे पूर्ण शहर वेठीस धरले गेले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात अनेकांचा मृत्यू

येथे पेट्रोल आणि डिझेल ६ रुपयांनी स्वस्त; सरकारने केली घोषणा

१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मराठी शिकणे अनिवार्य असेल, राज्य सरकारचा अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा

राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! मुंबईतील प्रसिद्ध 'एअर इंडिया' इमारत १६०० कोटींना विकत घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज शिर्डी दौरा; रेल्वे प्रवासाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

पुढील लेख
Show comments