Dharma Sangrah

शिवसेना प्रमुखांची संपत्तीचा वाद मिटला, हे ठाकरे झाले खरे वारस

Webdunia
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (16:53 IST)
राज्यातील आणि देशातील सर्वात मोठा राजकारणी, लोकांचा नेता असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे त्यांचे बंधू शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा संपूर्ण वाद मुंबई हायकोर्टातही गेला. पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल काहीतरी गफलत असून त्यात संशय व्यक्त केला. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात जयदेव ठाकरे यांनी मात्र अचानक दावा मागे घेतला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरेंना मिळाली असून,  खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नसल्याचं जयदेव ठाकरे स्पष्ट करत, याचिका मागे घेतली आहे. 
 
बाळासाहेब ठाकरेंचे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले. उद्धव यांनी उच्च न्यायालयात त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत कायदेशीर वाद सुरू झाला होता. मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले असा दावा केला होता. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला मात्र अचानक मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे घेत जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती उद्धव ठाकरेंना मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे शिवसेना जसे उद्धव वारस होते तसे आता मातोश्रीचे सुद्धा उद्धव वारस असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग कॅम्पस वर बुलडोझर चालला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी २०२७ च्या जनगणनेत जात जनगणनेचा समावेश करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला

हरिद्वार वनक्षेत्रात पाय कापलेले वाघ आणि वाघिणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली

India-Italy Partnership पंतप्रधान मोदी-मेलोनी यांची भेट आणि भारत-इटली विशेष सामरिक भागीदारी, झालेल्या करारांविषयी जाणून घ्या

पंतप्रधान मोदींकडून मेलोनीना स्पेशल गिफ्ट

पुढील लेख
Show comments