Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bhandara : भंडारा आदिवासी आश्रम शाळेतील 37 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Webdunia
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (10:27 IST)
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येरली येथे एका आदिवासी आश्रम शाळेत 37 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांनी जेवणात वरण ,भात, बटाटा, वाटाणा चपाती घेतली होती. जेवल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांचा पोटात दुखू लागले त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या37 विद्यार्थ्यांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालूक्यात येरलीच्या आदीवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावी  पर्यंतचे शिक्षण देण्यात येत असून ही आदिवासी आश्रम शाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालवली जाते. या आश्रमशाळेत 325 विद्यार्थी शिकतात. 

दररोज प्रमाणे गुरुवारी दुपारी विद्यार्थ्यांना जेवण दिले त्यात बटाटा, वाटाणा, चपाती, वरण, भात दिले. विद्यार्थ्यांनी जेवण केल्यावर काहीच वेळात त्यांच्या पोटात दुखायला लागले तर काहींना चक्कर आली. मुलांनी त्याची तक्रार शिक्षकांकडे केली असता त्यांनी दुर्लक्ष केले. 

संध्याकाळी विद्यार्थ्यांना जास्त त्रास होऊ लागला आणि काहींना उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीनं तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचार सुरु केले मात्र त्यापैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर इतर 33 विद्यार्थी धोक्याबाहेर आहे. 
या घटनेची माहिती मिळतातच जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र मुघलांच्या अधिपत्याखाली आहे, भाजपच्या मानसिकतेवर आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू

अमित शहांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला

शरद पवार आणि अजित पवार सातारा येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर

पुढील लेख
Show comments