Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भंडारा : एकाकडेच सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद असल्याने जिल्ह्यांचे नुकसान-बच्चू कडू

Webdunia
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (08:46 IST)
भंडारा : भंडाऱ्यात बुधवारी प्रहार पक्षाच्यावतीने वनविभागाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बच्चू कडू यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, पालकमंत्री हे प्रत्येक जिल्ह्याला दिलेच पाहिजे. यामध्ये सरकार थोडे चुकत आहे. तुम्ही कोणालाही पालकमंत्री करा, पण एकाकडे सहा-सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्याने त्या जिल्ह्यांचे नुकसान होत आहे, यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे, अशी खदखद बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
 
यावेळी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यात पुराच्या फटक्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, त्यांनी जिल्ह्याला भेट दिली नाही. मी सरकारमध्ये असलो तरी सरकार थोडे चुकत असल्याची स्पष्टोक्ती आमदार बच्चू कडू यांनी दिली. तसेच ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती केली. हे काम आधी केले असते तर आम्ही कुठेच गेलो नसतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments