Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारिप राज्यातील सर्व ४८ जागांवर निवडणूक लढविणार

Webdunia
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (09:33 IST)
भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भारिप महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात भारिप आणि काँग्रेसमध्ये मतभेद सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीसाठी काँग्रेसजवळ १२ जागांची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 
 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत युती केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रसेकडे १२ जागांवर निवडणुक लढविण्याची मागणी केली होती. ‘ही मागणी मान्य झाली नाही, तर भारिप महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवेल’, असा इशारा त्यांनी दिला होता. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments