Marathi Biodata Maker

भुजबळ म्हणतात, राज ठाकरे महायुतीमध्ये येत असतील तर आनंदच आहे......

Webdunia
बुधवार, 20 मार्च 2024 (09:41 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, राज ठाकरे महायुतीमध्ये येत असतील तर आनंदच आहे. इंडिया आघाडीमध्ये देखील कितीतरी पक्ष आहेत. राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर महायुतीची शक्ती वाढेल कमी होणार नाही. याचा फायदा विधानसभा आणि मनपाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होईल. कोणाची ताकद किती आहे हे मला माहिती नाही. कोणाला तरी बरोबर घायाचे आहे तर जागा द्याव्या लागतील.
 
जागावाटपावर छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, जागा वाटप हळूहळू होतायत. २० मे रोजी नाशिकची निवडणूक आहे. त्यामुळे अजून वेळ आहे. पाच टप्प्यात निवडणुका आहेत. त्यामुळे जागावाटप हळूहळू होत आहे. काही ठिकाणी निवडणुकांसाठी खूप वेळ आहे.  मोदी साहेबांना परत पंतप्रधान म्हणून पुन्हा बसवायचे आहे. त्यामुळे वरून आदेश आले तर सगळे शांत होतील. १० वर्षात हेमंत गोडसे यांनी काहीच केले नाही असे भाजप पदाधिकारी म्हणत असतील तर त्यावर नेते बघतील, असे त्यांनी म्हटले आहे.
 
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत शिवसेनेबरोबर होता तोपर्यंत कोणी काही बोलले नाही. शिवसेना आणि भाजप एकच हिंदूत्वाचा विचार आहे. शिवसेनेचं हिंदुत्व चालत मग भाजपचं का नाही? आम्ही फक्त युती केली. भाजपमध्ये विलीन झालो नाही, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारावर चालणार पक्ष आमचा पक्ष वेगळा आहे, असेही भुजबळांनी सांगितले.
Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments