Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर नवरी दागिने घेऊन फरार!

Webdunia
सोमवार, 4 एप्रिल 2022 (13:06 IST)
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दागिने घेऊन नवरी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल 2 लाख 90 हजारांचे दागिने या नवरीने गायब केले असून या मागे मोठी टोळी असल्याची शक्यता आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नववधूने लग्नाच्या अवघ्या दोन दिवसातच दागिने घेऊन पळून जाण्याची घटना उघडकीस आली.  शेतकरी राजू दौलत काकडे यांचा मुलगा ज्ञानेश्वर याचा विवाह जमत नसल्याने त्यांनी एका जालना येथील तुकाराम शिंदे यांच्या माध्यमातून हिंगोली शहरातील दिलीप जाधव यांची मुलगी सोनू या तरुणीशी त्यांचा विवाह ठरवला.
 
या लग्नासाठी तुकाराम शिंदे याने 3 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर 2 लाख 90 हजार रुपयांवर हा व्यवहार पूर्ण झाला. पैसे दिल्यानंतर दोन दिवसांपूर्वी शेलूद गावातील वाढोना परिसरातील भूयारेश्र्वर मंदिरात वैदिक पद्धतीने दोघांचा लग्न ही झाला. पण, लगनाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू अंगावरील दागिन्यांसह कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. या प्रकरणी राजू दौलत काकडेच्या फिर्यादी वरून नववधू आणि 2 मध्यस्थीसह चौघांवर  पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

पूजा खेडकरची IAS सेवा संपुष्टात,केंद्र सरकारची कारवाई

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली,तिघांचा मृत्यू, 27 जणांना वाचवण्यात यश

WhatsApp: व्हॉट्सॲपच्या या युजर्सना मिळणार नवीन ॲप अपडेट

सिमरनने महिलांच्या 200 मीटरमध्ये उपांत्य फेरी गाठली

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक गाडले गेले

पुढील लेख
Show comments