Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता

Webdunia
रविवार, 29 ऑगस्ट 2021 (17:07 IST)
राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे पुन्हा आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात 30 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढून परभणी, नाशिक,ठाणे,रायगड,कोकण पट्टा,पालघर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.याच बरोबर मराठवाड्यासह विदर्भ भागात देखील मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
पुढील 4 ते 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या मेघसरी कोसळणार आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी कमी प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. पण मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह महाराष्ट्रा मध्ये चांगल्या पावसाची शक्यता देखील यापूर्वी हवामान खात्या कडून वर्तवण्यात आली आहे.

संबंधित माहिती

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

पुढील लेख
Show comments