Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नावं बदलल्याने शहरांचा विकास होत नाही- अमोल मिटकरी

Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (14:02 IST)
भाजपने शहरांच्या नामांतरावरून राज्य सरकारला वेठीस धरू नये. शहरांची नावं बदलल्याने विकास होत नसतो, तर तिथल्या लोकांचा विकास महत्त्वाचा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं.
 
मिटकरी हे उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी उस्मानाबाद-धाराशिव या नामांतराबद्दल भाष्य केलं.
 
"औरंगाबादच्या नामांतराचा विषय महत्त्वाचा आहे. पण नाव संभाजी महाराजांचं द्यायचं आणि तिथे विकास नसणं, कचऱ्याचे प्रश्न भेडसावत आहेत," असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

"महाराष्ट्र सरकारने औरंगाबादच्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलं आहे. लवकरच शासन त्यावर निर्णय घेईल. उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याची मागणी होत असली तरी आजही भाजप नेत्यांच्या लेटरपॅडवर उस्मानाबाद लिहिलेलं आहे. जे या नामांतराची मागणी करत आहेत, ते राज्य सरकारला वेठीस धरतात. मग गुजरातमधील सर्वांत मोठं शहर असलेल्या अहमदाबादचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलून दाखवावं," असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं.
 

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

पुढील लेख
Show comments