Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एनसीबी'च्या कारवायांबाबत मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधानांना पत्र- नवाब मलिक

Webdunia
बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (09:50 IST)
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोवर (एनसीबी) होणारे आरोप, या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणारा पदाचा दुरुपयोग आदी तक्रारींबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधणार असल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी (26 ऑक्टोबर) सांगितलं.

समीर वानखेडे यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची विशेष चौकशी पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मलिक यांनी करतानाच एनसीबीवर गंभीर आरोप केले.

"मुंबईतील चित्रपट उद्योग हा हॉलीवूडनंतरचा जगातला एक मोठा उद्योग आहे. लाखो लोकांचा त्यावर रोजगार आहे. देशाच्या जीडीपीमध्ये तीन-चार टक्के वाटा आहे. जर या पद्धतीने या उद्योगाला बदनाम केले तर त्याचा परिणाम काही अभिनेत्यांवरच होईल असं नाही, तर लाखो लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. ते लाखो लोक अडचणीत येतील," याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिंता व्यक्त केल्याचं मलिक यांनी सांगितलं.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments