Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात लॉक डाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

Webdunia
शनिवार, 3 एप्रिल 2021 (19:51 IST)
सध्या कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना (महाराष्ट्र कोरोनाव्हायरस) चे सर्वाधिक 47,827 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी 202 लोक मृत्युमुखी झाले आहेत. राज्यात नवीन संसर्गित रुग्णांचा आकडा 29,04,076 च्या वर गेला आहेत. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रकरणात विक्रमी वाढ झाल्याचे जाहीर केले. शुक्रवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "कोरोनातील परिस्थिती जर अशीच राहिली तर लॉकडाऊनची शक्यता नाकारता येणार नाही."आज संपूर्ण लॉकडाऊन चे संकेत देत आहे. लॉक डाऊन लावण्यात येत नाही. 2 दिवसातच मी चर्चा करून यावर निर्णय घेईन.  
शुक्रवारी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते की ही मोठी कोंडी आहे. जर आपण लॉकडाउनची अंमलबजावणी केली तर आर्थिक चाक थांबेल. जर आर्थिक चाक कार्यरत असेल तर आपल्या सामोरं कठीण परिस्थिती दिसत आहे. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान लघु व मध्यम उत्पन्न व्यवसायातील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आता पुष्कळ लोकांसाठी नवीन प्रमाणावर होईल. काही वेळा पूर्वी सिनेमा, रिटेल आणि शॉपिंग इंडस्ट्रीशी संबंधित संस्थांनी ठाकरे यांना महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करू नये अशी विनंती केली होती. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (एमएआय), रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) आणि शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले होते की ते सरकारच्या सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरणं करीत आहेत, जर लॉकडाउन लागू केले तर व्यवसाय कमी होईल
उद्धव यांच्या मते लॉकडाउन टाळायचे असेल तर हे नियम पाळावे लागतील. लॉकडाऊन केल्यास विपक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचे म्हणत आहे . या वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की रस्त्यावर यायचे आहे तर नक्की या परंतु कोरोनाशी लढा देण्यासाठी या. आरोग्य कामगारांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा. 
ठाकरे म्हणाले की सध्या कोरोनाची ही लाट एका वादळं प्रमाणे आहे आणि लस म्हणजे छत्री प्रमाणे आहे. ही छत्री म्हणजे लस घेतल्यावर आपण सुरक्षित राहणार. परंतु सध्या आपण एका वादळाचा सामना करीत आहोत. या साथीच्या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला प्रोटोकॉल चे पालन करावे लागणार. जसे की मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे.    

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments