Marathi Biodata Maker

Cold wave in Maharashtra महाराष्ट्रात थंडीची लाट

Webdunia
मंगळवार, 3 जानेवारी 2023 (14:33 IST)
महाराष्ट्रात थंडीचा त्रास वाढला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात झपाट्याने घट झाली आहे. धुळे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. येथील तापमान 7.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रातील या भागांमध्ये तापमानात विशेष बदल होणार नाही. म्हणजे थंडी कायम राहणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त संपूर्ण देशाबद्दल बोलायचे झाल्यास, हवामान खात्याने उत्तर भारत, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, चंदीगडमध्ये थंड लाटेचा इशारा दिला आहे.
 
 महाराष्ट्रातील धुळ्याबरोबरच ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, जळगावचे तापमान 9.8 अंश सेल्सिअस, औरंगाबाद आणि नाशिकचे तापमान 10.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पुण्यात थंडी वाढली असून तापमान 12.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. नागपुरात किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मुंबईच्या तापमानात निश्चितच थोडी वाढ झाली असली तरी धुक्याने कहर सुरूच आहे.
 
जाणून घ्या तापमान कुठे नोंदवले गेले
वेगवेगळ्या भागातील तापमानाबद्दल बोलायचे झाले तर धुळे आणि जळगावमध्ये दहा अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय औरंगाबाद आणि नाशिकमध्ये 10.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात 12.5 अंश सेल्सिअस तर नागपुरात 13.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये 14.1 अंश सेल्सिअस, मालेगावमध्ये 14.6 अंश सेल्सिअस आणि साताऱ्यात 14.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय मुंबईतील सांताक्रूझमध्ये 16.6 अंश सेल्सिअस तर मुंबईलगतच्या डहाणू भागात 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. परभणीमध्ये 17 अंश, उदगीरमध्ये 17.5 अंश आणि नांदेडमध्ये 17.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सांगलीत 18.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोकणातील रत्नागिरीत 19.1 अंश सेल्सिअस, मुंबईतील कुलाबा येथे 19.2 अंश सेल्सिअस आणि कोल्हापुरात 19.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरमध्ये 20.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
 
धुक्याचा कहर संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे
धुक्याच्या कहराचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे दिसून येत आहे. वाढत्या थंडीचा परिणाम रब्बी पिकांसाठी फायदेशीर मानला जात आहे. थंडीचा त्रास सुरू असला तरी ही एक सकारात्मक बाब समोर येते. कडाक्याच्या थंडीमुळे लोक घरात बसले आहेत. सकाळी रस्त्यावर कमी वर्दळ असते.
Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

२०२५ मध्ये महाराष्ट्रात ४८,००० हून अधिक महिला बेपत्ता झाल्या, ज्यामध्ये मुंबईत मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण १० पटीने वाढले

अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावात

डोंबिवली : नर्ससोबत प्रेमसंबंध तर पत्नीशी वाद; डॉक्टरने बिअरसोबत झोपेच्या ४५ गोळ्या घेतल्या

बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा

पुढील लेख
Show comments