suvichar

थंडी आली, आता दोन ते तीन दिवसांत गारवा वाढणार

Webdunia
राज्याच्या बहुतांश भागांत सध्या तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार होत आहे. मात्र, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने, त्याचप्रमाणे उत्तर भारतातून राज्याकडे थंड वारे वाहणार असल्याने दोन ते तीन दिवसांत गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाडय़ातील किमान तापमानात घट झाल्याने तेथे रात्री थंडी जाणवत आहे. मुंबईकरांना मात्र थंडीची प्रतीक्षा आहे.
 
दक्षिण मध्य महाराष्ट्रात सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचप्रमाणे दोन ते तीन दिवसांपासून उन्हाचा चटकाही बसू लागला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामानाची स्थिती आहे. या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याने रात्रीचा गारवा कमी झाला आहे. मात्र, ही स्थिती तीन ते चार दिवसांनी बदलणार आहे. राज्यात कोरडे हवामान होणार आहे. त्यामुळे गारवा वाढण्याचा अंदाज आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार

रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणा बाबत दिले स्पष्टीकरण

नाशिकच्या एका मोठ्या कंपनीत लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतराचे आरोप, ६ जणांना अटक

मुंबईत 2 विद्यार्थ्यांचा ड्रग्ज ओव्हरडोसने मृत्यू, पाच जणांना अटक

आयुर्वेदाचार्य वैद्य सुविनय दामले यांचे इंदूरमध्ये व्याख्यान; 'आरोग्य रहस्या'चा उलगडा होणार

पुढील लेख
Show comments