Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा गोंधळ,यंदा परीक्षा केंद्राचा घोळ निर्माण झाला

Webdunia
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (14:56 IST)
आरोग्य विभागाच्या परीक्षा गेल्या महिन्यात होणार होत्या,परंतु प्रवेश पत्रावर काही चुका असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता.त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचा घोळ झाला आहे.त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

आरोग्य भरतीच्या परीक्षेचा पेपर दोन सत्रात असून उमेदवारांना एका पेपर साठी सकाळी वेगळे परीक्षा केंद्र एका जिल्ह्यात तर संध्याकाळच्या पेपरचे केंद्र दुसरे वेगळ्या जिल्ह्यात देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षा कशी द्यावी हा मोठा प्रश्न पडला आहे.विध्यार्थ्यांना आपल्या आवडीचे केंद्र निवडण्याचा अधिकार असताना या परीक्षेला आयोजित करणाऱ्या कंपनी कडून विध्यार्थ्यांना वेगळेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. एकाच विद्यार्थ्याला एकाच पदासाठी परीक्षा देण्यासाठी 2 जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे.वेळ देखील एकच दिली आहे.एका पदासाठीची परीक्षे साठी आवेदन केले असताना 430 रुपये फी आकारण्यात आली असताना दोन पदासाठी खात्यातून 860 रुपये काढण्यात आले.काहींनी तर पदासाठी आवेदनच केले नाही तरीही त्यांना प्रवेश पत्र देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षे संदर्भात चांगला गोंधळ उडाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा आयोजित करणारी कंपनी सक्षम नसून देखील त्याच कंपनीकडून परीक्षा घेण्याचा आग्रह का धरला जात आहे. कंपनीच्या सावळ्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे.एक पेपर एका केंद्रात तर दुसरा पेपर दुसऱ्या जिल्ह्याच्या केंद्रावर उमेदवारांनी परीक्षा  देण्यासाठी कसे जावे असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांचा पुढे निर्माण झाला आहे.   

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments