Marathi Biodata Maker

आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही : संजय राऊत

Webdunia
शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (08:59 IST)
शिवसेना पक्ष फुटला असल्यामुळे त्यांना तेवढ्या जागा देता येणार नाहीत, असे काँग्रेसने म्हटले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले, “आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही. आमदार आणि खासदार निघून जातात. पण मतदार हा आमच्या बरोबर आहे.”
 
आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही. आमदार आणि खासदार निघून जातात. पण मतदार हा आमच्या बरोबरच आहे. शिवसेनेने याआधी 23 जागा लढवलेल्या आहेत. त्यापैकी १८ खासदार निवडून आले होते. त्या २३ जागांवर शिवसेना लढणार आहेच, ही आमची भूमिका आहे. जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू, पण काँग्रेसकडे एकतरी जिंकलेली जागा आहे का? काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची आहे. तरीही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत”, अशा शब्दात सध्या काँग्रेसकडे एकही खासदार नसल्याबाबतचा टोला संजय राऊत यांनी लगावला.
 
संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही 23 जागा लढणार आहोत, हे अत्यंत काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने सांगत आहोत. महाराष्ट्रातील काही नेते टिप्पणी करत असतील तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. शेवटी काँग्रेसचे दिल्लीतील नेते याबाबत निर्णय घेतील. तसेच वंचित बहुजन आघाडीबाबत जशी शरद पवार यांनी चर्चा केली, तशी उद्धव ठाकरे यांनीही चर्चा केली. शिवसेना आणि वंचित यांच्या आघाडीचा निर्णय आधीच झालेला आहे. पण त्यांनी महाविकास आघाडी आणि इडिया आघाडीत असावे, अशी आमची भूमिका आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

तैवानला ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला

या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 येणार

LIVE: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत एक महत्त्वाचे विधान केले

विद्येच्या मंदिरात रक्तरंजित हल्ला; लग्न करण्यास नकार दिल्याने जुन्नरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला

इराण-इस्रायल युद्धादरम्यान भारतात एलपीजी आणि तेलाची कमतरता भासणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला आश्वासन दिले

पुढील लेख
Show comments