Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात कोरोनाची लाट लवकरच ओसरणार, आरोग्य मंत्र्यांची माहिती

Webdunia
शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (18:17 IST)
राज्यात कोरोनाचा उद्रेक आता कमी झाला आहे. मृत्युदरात देखील घट झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या देखील आटोक्यात आली असल्याने आता निर्बंधांमध्ये देखील सूट देण्यात आली आहे. 
या मुळे आता सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाची लाट कधी संपणार या बाबत अनेक प्रश्न निर्माण होत असताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांनी जालन्यात प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी दिली आहे. 

ते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारची चिंता वाढली होती. परंतु आरोग्य विभागाच्या उपाययोजनेमुळे परिस्थिती आटोक्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये या साठी राज्य  शासनाने कोरोना निर्बंध लावले होते. आता कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे राज्यसरकार आता निर्बंध कमी करण्याचा विचार करत आहे. जरी काही जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी रुग्णसंख्येत कमी होईल. सध्या राज्य सरकार कोरोनाचे निर्बंध टप्प्याटप्प्याने  कमी करण्याचा विचार करत आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च पर्यंत कमी होऊ शकते. तज्ञांच्यामते कोरोनाची लाट मार्च पर्यंत ओसरण्याची शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख