Dharma Sangrah

राज्यात दलित अत्याचारांच्या घटनेत घट

Webdunia
साल २०१६ मध्ये अपेक्षेप्रमाणे देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशात झाली, पण गुन्ह्य़ांचे सर्वाधिक कमी प्रमाणही उत्तर प्रदेशाने नोंदविले. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळमध्ये गुन्ह्य़ांची नोंद झाल्याची माहिती देणारा सर्वंकष अहवाल राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) गुरुवारी प्रकाशित केला. महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्य़ांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो. तर  राज्यातील दलित अत्याचारांच्या घटनांची संख्या खूपच कमी आहे.
 
२०१६मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या ४८ लाख ३१ हजार ५१५ इतकी आहे. २०१५मध्ये हीच संख्या ४७ लाख १० हजार ६७६ इतकी होती. म्हणजे गुन्ह्य़ांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात २ लाख ८२ हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे. २०१५मध्ये ती २ लाख ४१ हजार इतकी होती. उत्तर प्रदेशात सर्वाधिक गुन्हे नोंदविले असले तरी गुन्ह्य़ांचे प्रमाण (प्रति एक लाख लोकसंख्या) देशात सर्वाधिक कमी म्हणजे १२८ इतके आहे. देशाची एकूण सरासरी २३३ आहे. महाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या २०१५मधील ४ लाख २३ हजारांवरून २०१६मध्ये ४ लाख ३० हजारांवर गेली. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे २१७ इतके आहे. 
 
महाराष्ट्रातील दलित अत्याचारांच्या घटनांची संख्या खूपच कमी आहे आणि ती २०१५च्या तुलनेत २०१६मध्ये आणखी कमी झालेली आहे. २०१५मध्ये १८०४ घटना घडल्या होत्या, २०१६ मध्ये ही संख्या घटून १७५०वर आलेली आहे. ४.३ टक्क्यांची ही घट आहे. 
 
दलित अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण लक्षात घेतले देशात महाराष्ट्राचा बारावा क्रमांक लागतो. या १७५० घटनांपैकी दलित महिलेच्या विनयभंगाच्या ३५२, लैंगिक छळवणुकीच्या १३७ आणि बलात्कार व बलात्काराच्या प्रयत्नांच्या २२० घटना आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र दिनानिमित्त एक मोठी भेट: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन झाले

नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा कहर; कोंबड्या मारण्याचे आदेश तर कुक्कुटपालन उद्योगात घबराट

LIVE: महाराष्ट्र दिनी नागपूरमध्ये गोंधळ उडाला, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन

GT vs RCB: गुजरातने मोटेरा येथे बंगळूरला ४ गडी राखून पराभूत करत प्लेऑफचा मार्ग मोकळा केला

महाराष्ट्र स्थापना दिवशी नागपूरमध्ये प्रचंड गोंधळ, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन

पुढील लेख
Show comments