Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट करावे लागतात

Webdunia
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (10:18 IST)
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर काँग्रेसने देखील दानवेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट करावे लागतात, अशी टीका केली  आहे. 
 
“रावसाहेब दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अश्या प्रकारची वक्तव्य करावी लागतात. या देशासाठी काँग्रेस पक्षाचा तसंच काँग्रेस नेतृत्वाचा त्याग आहे. जवाहरलाल नेहरु 13 वर्ष जेलमध्ये राहिले, इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली. काँग्रेसचा इतका त्याग असताना भाजपचा देशासाठी काय त्याग आहे?”, असा सवाल करत भाजप काँग्रेसशी बरोबरी देखील करु शकत नाही, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.
 
“भाजपची भूमिका नेहमीच द्वेषाची राहिलेली आहे. देशातल्या विविध जातिधर्मांच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याची यांची भूमिका राहिलेली आहे. लोकांची आपसात तंटे कसे लागतील आणि त्याचा राजकीयदृष्ट्या आपल्याला फायदा कसा होईल, हाच डाव भाजप खेळत आलं आहे, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली. दानवेंच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देण्याची गरज वाटत नाही, असं ठाकरे म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments