Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मामाच्या लग्नात भाच्याचा मृत्यू

death
Webdunia
शनिवार, 28 मे 2022 (15:47 IST)
काळ कधी कुठे आणि कोणावर झडप घालणार हे कोणालाच माहित नाही. लग्नाच्या वरातीत एका मुलावर काळाने झडप घातली आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरच्या खापा गावात घडली आहे. 
लग्न होण्याच्या आनंदात नवरदेव होता.लग्न मंडपात जाण्यापूर्वी नवरदेवाची वरात घोड्यावरून निघाली. वऱ्हाडी आणि सर्व जण आनंदात बँडच्या तालावर नाचत होते आणि अचानक नवरदेव ज्या घोड्यावर स्वार होता तो घोडा बिथरला आणि त्याने उंच होऊन लाथ उडवली. घोड्याची लाथ नवरदेवाच्या भाच्याला लागली आणि तो जखमी होऊन त्याचा दुर्देवी अंत झाला. हशमेल सलमान शेख असे या मयत मुलाचे नाव असून तो शिवा सावंगा येथून आपल्या मामाच्या लग्नासाठी आई-वडिलांसह खापा येथे आला होता. सकाळपासूनच लगीनघाई सुरु होती. लग्नघटिका जवळ येत असल्याने सर्व आनंदात होते.घोड्यावर नवरदेवाची वरात निघाली सोबत बॅण्ड होता.बँडच्या तालावर सर्व नाचत होते. बँडच्या तालावर घोडाही नाचू लागला.अचानक वस्तीतील एकाने नवरदेवावरून ओवाळणी करून दहा रुपयांच्या नोटांची उधळण केली. 

ओवाळणीतील नोटा उचलण्यासाठी हमशेल घोड्यामागे गेला. त्याच वेळी घोडा बिथरला आणि त्याने हमशेलला लाथ मारली. बेसावध असलेला हमशेल दगडावर जाऊन आदळला आणि गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले नंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला सावनेरच्या जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे अंतरक्तस्राव झाल्यामुळे त्याची प्राण ज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.हमशेलच्या मृत्यूची माहिती मिळतातच खापा गावात शोककळा पसरली आहे.    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाणे : महिलेवर लैंगिक अत्याचार आणि छळ केल्याप्रकरणी तरुणाला अटक

ठाण्यातील प्लायवूड गोदामाला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचा जवान जखमी

मुलं लंडनला गेली आणि ड्रग्ज तस्कर बनली, नवी मुंबईतील श्रीमंत बिल्डर वडिलांची आत्महत्या

पाणीटंचाई दूर होईल,पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले कडक निर्देश

काटोल आणि नरखेड गावांचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल बावनकुळे म्हणाले

पुढील लेख
Show comments