Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढची किमान दहा वर्षे विरोधक सत्तेवर येणार नाहीत

devendra fadnavis
Webdunia
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (11:37 IST)
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष किंवा त्यांची आघाडी पुढची 10 ते 15 वर्षे सत्तेत येणार नाही. त्यांनी सत्तेची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या दोन्ही पक्षांची अवस्था सत्तेशिवाय 'जल बिन मछली' अशी झाली आहे. सत्ता असताना या दोन्ही पक्षांनी शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही आणि आता हल्ला बोल यात्रा काढत फिरत आहेत.
 
स्वामिनाथन आयोगाचा अहवाल 2004 मध्ये आला. 2004 ते 2014 या कालावधीत केंद्रात आणि राज्या सस्ता होती त्यावेळी या आयोगाच्या शिफारसी लागू का केल्या नाहीत? असाही सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या देवेंद्र साटम यांनी भाजपध्ये प्रवेश केला, त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. बाळासाहेब ठाकरेंनी जे शिवसैनिक घडवले त्यापैकी एक शिवसैनिक म्हणजे देवेंद्र साटम आहेत असे म्हणत एका देवेंद्रच्या मदतीला दुसरा देवेंद्र धावून आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
याच कार्यक्रात मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या कारभारावर ताशेरे झाडले. भाजपच्या आधी असलेल्या आघाडी सरकारने काय दिले तर कोंढणेचा भ्रष्टाचार दिला, जनतेला लुटण्याचे काम केले मात्र जनतेनी त्यांना नाकारले आणि विकासाला प्राधान्यदेणारे सरकार निवडले. राष्ट्रवादीचे लोक आता हल्लाबोल यात्रा काढत आहेत त्यांनी त्याचा व्यवस्थित सराव करावा त्यांना आता पुढे असेच करायचे आहे कारण पुढची दहा ते पंधरा वर्षे ते सत्तेतयेऊ शकणारच नाहीत असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 
महाराष्ट्राची जनता दयाळू आहे, कनवाळू आहे मात्र साडेतीन वर्षात ही जनता तुमची पापे विसरणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही महाराष्ट्रात काय काय केले आहे हे जनतेला ठावूक आहे. राज्यातले दीन-दलित, महिला वर्ग, वंचित, शेतकरी यांना लुटण्याचे काम तुम्ही पंधरा वर्षे केले. तुम्ही फक्त सत्ता उपभोगली आणि आता सत्ता गेल्यावर तुमची अवस्था पाण्याबाहेर तडफडत असलेल्या मासोळीसारखी झाली आहे. तुमची तडफड अशीच होणार आहे. पुढच्या पंधरा वर्षांत तुमची सत्ता येणार नाही हे लक्षात ठेवा, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Terror attack in Pahalgam पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोन मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले

LIVE: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले

न्यायालय आणि न्यायाधीशांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी, महिलेला तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड

क्रिकेटपटू मोहम्मद सिराजने अमित शहांचा फोटो शेअर करून मोठी मागणी केली

जालना: सुनेने केली सासूची हत्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढील लेख
Show comments