Festival Posters

“शतकोत्तर रौप्यमहोत्सवी’चे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांसाठी थांबविले

Webdunia
बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (09:37 IST)
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सव महापालिकेकडून साजरा केला जाणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असली, तरी फक्‍त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने या महोत्सवाचे उद्‌घाटन थांबले आहे. दरम्यान, या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 12 ऑगस्टची वेळ देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला अजून दुजोरा देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.
 
यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून या वर्षीच्या अंदाजपत्रकात सुमारे 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्या निधीतून वेगवेगळे 17 उपक्रम घेण्यात येणार आहेत. त्यात 2 विश्‍वविक्रमही केले जाणार आहेत. त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यातच गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर आला असल्याने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, सत्ताधारी भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतच या महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडेही घातले आहे. मात्र, अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यांना 12 ऑगस्टला उद्‌घाटनासाठी येण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, त्याला अजून मुख्यमंत्री कार्यालयाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या कार्यक्रमाचे नियोजन करावे, की नाही? याबाबत प्रशासन तसेच पदाधिकारीही संभ्रमात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या महोत्सव उद्‌घाटनाचा आढावा घेण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी रात्री उशिरा महापौर बंगल्यावर बैठक बोलाविली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

टाटा ओपन गोल्फ: टाटा ओपनमध्ये जगलान आणि संधू यांची संयुक्त आघाडी

भारताने नूर खान एअरबेसवर मोठा हल्ला केला..., पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची मोठी कबुली

शिवसेनेच्या नगरसेवकाच्या पतीच्या हत्येप्रकरणी रायगडमध्ये नऊ जणांना अटक

बीएमसी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेमध्ये 227 पैकी 207 जागांवर सहमती

जालन्यात दुर्दैवी अपघात, नदीच्या काठावर भरलेल्या खड्ड्यात 65 वर्षीय महिला आणि 5 वर्षांचा नातवाचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments