Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर पातळीसोडून टीका

Webdunia
मंगळवार, 4 एप्रिल 2023 (07:20 IST)
सावरकरांवर बोलताना शरम बाळगावी. थू… तुमच्यावर. तुमची पात्रता नाही सावरकरांवर बोलायची, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमची बोलण्याची लायकी नाही. तुमच्यावर बोलायलाही मला लाज वाटते. इंदिरा गांधी यांनी सावरकरांचा सन्मान केला. आणि तुम्ही त्यांचा अपमान करत आहेत. तुम्हाला शरम वाटली पाहिजे.
 
चारकोप येथे सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका केली. ते म्हणाले, सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना यातना सहन केल्या. आणि चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले सावरकरांना माफीवीर म्हणतात. तुमची लायकी तरी आहे का?, सावरकरांबद्दल बोलण्याची, अशी टीका फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
 
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. सावरकरांवर बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी जोडे मारले होते. आता रोज सावरकरांचा अपमान होत आहे. तरी उद्धव ठाकरे हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आम्ही अपमान सहन करणार नाही ही केवळ बोलले जात आहे. त्यामुळेच आम्हाला राहुल गांधी यांना जोडे मारावे लागेल. राजीव गांधी यांच्या जयंतीला तुम्ही पुष्पहार अर्पण करता. पण बाळासाहेबांच्या जयंतीला कधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी पुष्पहार अर्पण केला का?, असा सवाल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

वक्फ बोर्डाने हिंदू-आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा आरोप

प्राण्यांमध्ये जाणिवा असतात का, त्यांना ही भाव-भावना असतात का?

मुंबईतल्या 'या' काॅलेजमध्ये हिजाब, बुरखा, नकाबवर बंदी; 9 विद्यार्थिनींची कोर्टात धाव

मनोज जरांगेंनंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू, सरकारच्या शिष्टमंडळाकडून दोघांनाही 'हे' आश्वासन

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांशी मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

दिल्लीत होणार भाजपच्या बड्या नेत्यांची महत्त्वाची बैठक,पराभवानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होणार

EVM वादावरून प्रफुल्ल पटेल यांचा इलॉन मस्क यांना फुकटचा सल्ला देऊ नका म्हणत हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडीच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू, असा झाला अपघात

अमोल कीर्तिकरांची जागा आम्ही जिंकली, आदित्य ठाकरेंनी EVM वर प्रश्न उपस्थित केला, कोर्टात जाणार म्हणाले

Blade in Air India Meal एअर इंडियाच्या खाद्यपदार्थात सापडले ब्लेड, प्रवाशांनी केला गोंधळ, एअरलाइनला माफी मागावी लागली

पुढील लेख
Show comments