Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस करावे- नाना पटोले

Webdunia
रविवार, 16 मे 2021 (10:16 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचे धाडस करावे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.
नाना पटोले यांनी म्हटलं, "देशाचे स्मशानभूमीत रुपांतर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहावे. देशात आज दररोज चार लाखांहून अधिक रुग्ण आणि चार हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. या परिस्थितीला केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा कारणीभूत आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत."
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 12 फेब्रुवारी 2020 रोजी कोरोना त्सुनामीसारखं संकट असल्याचा इशारा दिला होता. पण नरेंद्र मोदी यांनी ते गांभीर्याने घेतले नाही अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments