rashifal-2026

बेहिशेबी प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक

Webdunia
गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (09:29 IST)
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ५७ लाख रुपयांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि बाजार समितीचे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांना बुधवारी चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. याबाबत कर्मचाऱ्यानी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली आहे.
 
साधारपणे तीन महिन्यापूर्वी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पेठरोडवर स्विफ्ट डिझायर (एमएच १५ सीएम २१८०) कारमधून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली होती.  त्यानंतर याप्रकरणी बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारे सानुग्रह अनुदान, बक्षीस वेतनाची रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम बँक मॅनेजरशी संगनमत करून परस्पर काढून जवळ बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तीनदा चौकशी केल्यानंतर सदरची रक्कम बाजार समितीची नसल्याचे समोर आले आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांना वाटप केली जाणारी लाखो रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या ताब्यात कशी तसेच बॅँकेतून परस्पर रक्कम कशी काढली होती. ही रक्कम डिए  आणि भविष्य निर्वाह निधी असल्याचे उघड झाले असून संचालक मंडळाने कर्मचारी वर्गावर सक्ती केली होती की ही रक्कम प्रतिज्ञा पत्रावर शि घेतली होती. याबाबात कर्मचारी वर्गाने पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला होता.त्यावरून  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंगळे यांची चौकशी केली मात्र तीवेळेस चुकीचे आणि न पटणारे कारणे दिले असल्याने आज त्यांना विभागाने अटक केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

वर्धा येथील लाडकी बहीण योजना संकटात, पोर्टलच्या समस्यांमुळे लाभार्थ्यांना त्रास

१५ दिवसांत चांदीच्या किमती ५७,००० रुपयांनी वाढल्या, या शहरांमध्ये पहिल्यांदाच ३ लाख रुपयांच्या पुढे गेल्या

मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या विधानाला चोख उत्तर देत म्हटले की, विरोधक त्यांच्या पराभवासाठी सबबी शोधत आहेत

राज ठाकरे यांनी पराभव स्वीकारला आहे का? आशिष शेलार यांनी पीएयू वादावर जोरदार हल्लाबोल केला

पुढील लेख
Show comments