Festival Posters

देश भ्रष्टाचाराच्या विळख्यात, म्हणे आम्ही भ्रष्टाचार रोखला धनंजय मुंढे यांची टीका

Webdunia
गुरूवार, 24 जानेवारी 2019 (10:58 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्धार परिवर्तनाचा या यात्रेला जालन्यातील जिंतूर येथे चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण देश भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे, तरी पंतप्रधान मोदी देशात भ्रष्टाचार नसल्याचा दावा करतायत. भाजपा सरकारने जनतेला कर्जमाफी, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख, २ कोटी रोजगार अशी एकापेक्षा एक फसवी आश्वासने दिली, पण ती पूर्ण केली नाहीत. मंत्रिमंडळात शेतकरी नसल्यामुळेच कर्जमाफी होत नाही, अशी जोरदार टीका या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
 
जेष्ठ नेते छगन भुजबळ  यांनीही सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. ना घर बसा हमारा, ना बसने देंगे तुम्हारा, असा मोदी आणि योगींचा नारा आहे. २०१४ साली सरकारला राम मंदिर आठवले नाही. मात्र सत्ता डळमळीत झाल्यामुळेच राम मंदिरचा विषय परत काढण्यात आलाय. इव्हिएम मशीनमध्ये घोटाळा केल्याची माहिती गोपीनाथ मुंडे यांना समजली. त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याची माहितीही आता समोर आली आहे. इतके सगळे करूनही मोदींना पाच राज्यांत पराभवच पत्करावा लागला, याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ चे उद्घाटन केले

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

महाराष्ट्रातील हवामानात बदल, काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटा तर काही भागात पावसाचा इशारा

दिल्लीत तिहेरी हत्याकांड; पतीने पत्नी आणि तीन मुलींचा गळा चिरून केली निर्घृण हत्या

बँकॉकहून मुंबई विमानतळावर येणाऱ्या तीन प्रवाशांकडून २३ कोटी रुपयांचा गांजा जप्त

पुढील लेख
Show comments