Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'काँग्रेससोबत जाऊ' हा शब्द बाळासाहेबांना दिला होता का ?

Webdunia
गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (15:03 IST)
'काँग्रेससोबत जाऊ' हा शब्द बाळासाहेबांना शिवसेनेने दिला होता का? असा प्रश्न विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. राज्यात सर्वात जास्त जागा भाजपला मिळाल्या. 1990 नंतर भाजपला दोनवेळा 100 पेक्षा अधिक जागा मिळाल्या. मात्र हे सरकार हाराकिरीचे सरकार आहे, असाही टोला फडणवीस यांनी लगावला. नागपूर अधिवेशनात राज्यकालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. या चर्चेत फडणवीस यांनी 'सामना'मधले पवारांबाबतचे उल्लेख वाचून दाखविले. ज्यामुळे गदारोळ झाला.
 
मी 'सामना' वाचत नव्हतो पण आता सबस्क्रिप्शन लावले. पवारांबाबत काय काय बोलले गेले, उद्धव ठाकरेंबाबत काय काय बोलले गेले हे महाराष्ट्राला ठाऊक आहे असे म्हणताच गदारोळ झाला. त्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच टोले लगाविला. ज्यावरून शिवसेनेचे आमदार, मंत्री हे चांगलेच चिडले. माझा वेळ हेच लोक खात आहेत, माझ्या आरोपांना उत्तर देऊन असाही टोला फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले होते की आमच्यापुढे सगळे पयार्य खुले आहेत. त्याच्या सोयीस्कर विसर शिवसेनेला पडला आहे.
 
25 हजार हेक्टरी मदत कोरडवाहू शेतीला आणि 50 हजार रुपये हेक्टर बागायती शेतीला देऊ असे आश्वासन मख्यमं‍त्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
 
अल्प भूधारक शेतकर्‍यांना हे आश्वासन देण्यात आले होते. अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे आश्वासन  देण्यात आले होते त्याचे काय झाले? तुम्ही दिलेला शब्द तुम्हीच पाळला नाही. तुम्ही केंद्र सरकारला मदत मागितली होती पण घोषणा केंद्र सरकारच्या जीवावर केली होती का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments