Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'काँग्रेससोबत जाऊ' हा शब्द बाळासाहेबांना दिला होता का ?

Did Balasaheb give the word  go with the Congress
Webdunia
गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (15:03 IST)
'काँग्रेससोबत जाऊ' हा शब्द बाळासाहेबांना शिवसेनेने दिला होता का? असा प्रश्न विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. राज्यात सर्वात जास्त जागा भाजपला मिळाल्या. 1990 नंतर भाजपला दोनवेळा 100 पेक्षा अधिक जागा मिळाल्या. मात्र हे सरकार हाराकिरीचे सरकार आहे, असाही टोला फडणवीस यांनी लगावला. नागपूर अधिवेशनात राज्यकालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. या चर्चेत फडणवीस यांनी 'सामना'मधले पवारांबाबतचे उल्लेख वाचून दाखविले. ज्यामुळे गदारोळ झाला.
 
मी 'सामना' वाचत नव्हतो पण आता सबस्क्रिप्शन लावले. पवारांबाबत काय काय बोलले गेले, उद्धव ठाकरेंबाबत काय काय बोलले गेले हे महाराष्ट्राला ठाऊक आहे असे म्हणताच गदारोळ झाला. त्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच टोले लगाविला. ज्यावरून शिवसेनेचे आमदार, मंत्री हे चांगलेच चिडले. माझा वेळ हेच लोक खात आहेत, माझ्या आरोपांना उत्तर देऊन असाही टोला फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले होते की आमच्यापुढे सगळे पयार्य खुले आहेत. त्याच्या सोयीस्कर विसर शिवसेनेला पडला आहे.
 
25 हजार हेक्टरी मदत कोरडवाहू शेतीला आणि 50 हजार रुपये हेक्टर बागायती शेतीला देऊ असे आश्वासन मख्यमं‍त्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
 
अल्प भूधारक शेतकर्‍यांना हे आश्वासन देण्यात आले होते. अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे आश्वासन  देण्यात आले होते त्याचे काय झाले? तुम्ही दिलेला शब्द तुम्हीच पाळला नाही. तुम्ही केंद्र सरकारला मदत मागितली होती पण घोषणा केंद्र सरकारच्या जीवावर केली होती का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना' लागू होणार, मुलींना मिळणार 10 हजार रुपये

वक्फ संशोधन विधेयक आज लोकसभेत सादर होणार, चर्चेसाठी ८ तासांचा वेळ निश्चित

LIVE: बुलढाणा जिल्ह्यात बस आणि एसयूव्हीच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

नवविवाहित जोडप्याला भरधाव ट्रकने चिरडले, दुचाकीवरून पत्नीच्या माहेरी जात होते

मुंबईत रिमझिम पाऊस, राज्यातील अनेक भागांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट घोषित

पुढील लेख
Show comments