Marathi Biodata Maker

सोमवारपासून अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टारांचा बंद

Webdunia
बुधवार, 20 एप्रिल 2022 (21:54 IST)
अहमदनगर तीसगाव (ता. पाथर्डी) येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून (18 एप्रिल) जिल्ह्यातील सर्व रुग्णालये बंद ठेवण्यात येतील, असा इशारा डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे.
 
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन हा इशारा दिला आहे.
यावेळी अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, राज्य सदस्य डॉ. निसार शेख, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखडे, उपाध्यक्ष डॉ सागर झावरे, डॉ अमित करडे, डॉ. अशोक नरवडे, डॉ. गणेश बडे,
 
डॉ. अशोक पाटील, डॉ. मिश्रा, डॉ. केसरी, डॉ. सुनील साबळे, डॉ.श्वेता भालसिंग ,डॉ. सुरेंद्र रच्चा उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील शुक्रवारी तिसगाव येथे डॉ. नीलेश म्हस्के यांच्या वर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
 
गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु आजतागायत गुन्हेगारांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे जर या पवार नावाच्या केडगाव मधील आरोपींना अटक करण्यात आली नाही,
 
तर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व रूग्णालये, क्लिनिक, अत्यावश्यक रूगणसेवासुद्धा, सोमवारपासून सुरक्षेअभावी बेमुदत बंद ठेवण्यात येईल. भयमुक्त वातावरणात काम करता येणे हा सर्व डॉक्टर्सचा मुलभूत अधिकार जर डावलण्यात येत असेल तर हे पाऊल उचलावेच लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments