Marathi Biodata Maker

पंचनाम्याला विलंब करू नका, मोबाइलवरुन फोटो अपलोड करा

Webdunia
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (16:34 IST)
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सदरच्या पंचनाम्याला विलंब लागत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइल फोनवरुन फोटो अपलोड केले तरी चालतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 
 
आता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलवली असून कशा स्वरुपाची तात्काळ मदत करता येईल, काय अतिरिक्त मदत देता येईल त्यादृष्टीने निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडेही मदतीची मागणी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांचं हातातलं पीक वाया गेल्यामुळे दु:ख आहे. पालकमंत्री, आमदारांनी आपापल्या भागांना भेट द्यावी. सरकार हा विषय अत्यंत गांभीर्याने हाताळणार असल्याचे सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं असून ५३ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचं नुकसान झालं आहे. कोकणात ४६, नाशिकमध्ये ५२ आणि नागपूरमध्ये ४८ तालुके बाधित झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; आंदोलनाच्या तारखेपूर्वी प्रमाणपत्र द्या, अन्यथा...

धर्मांतरण प्रकरणात निदा खानच्या कोठडीत वाढ, जामीन अर्जावर सुनावणी २५ मे रोजी

LIVE: मुंबईतील मानखुर्द येथे नवीन कारागृह बांधण्यात येणार

मुंबईतील मानखुर्द येथे नवीन कारागृह बांधण्यात येणार, कारागृह प्रशासनाला ११ एकर जमीन मिळाली

धुळे जिल्ह्यातील शिरपूर मध्ये पत्नी समोर अपमान केल्याने, मुलाने केली आई वडिलांची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments