Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या कारणामुळे शेतकरी भयभीत त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यापासून घाबरतात

Webdunia
शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (15:40 IST)
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
नुकतेच कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी व चांदेकसारे परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकर्‍यांना आपल्या शेतात जाणे कठीण बनले आहे.
या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने सोनेवाडी परिसरात पिंजरा बसवावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,पंचकेश्वर परिसरात संजय मोहन गुडघे यांच्या उसाच्या शेतात गेल्या दोन दिवसांपासून हा बिबट्या दबा धरून बसलेला आहे. एकेदिवशी नवनाथ गुडघे हे आपल्या शेतात जनावरांसाठी घास कापत असताना त्यांना हा बिबट्या दिसला.
त्यांनी आसपास असलेल्या शेतकर्‍यांनाही याबाबत महिती दिली. या बिबट्याने एक कुत्रा व कालवडीची शिकार केली. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या चांदेकसारे, सोनेवाडी पोहेगाव पंचकेश्वर शिवारात मुक्त संचार करीत असल्याने,शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने तात्काळ या परिसरात पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी पोलीस पाटील दगु गुडघे यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विश्वविजेता भारतीय संघ बार्बाडोसहून भारताकडे रवाना

अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय 5 जुलै रोजी निकाल देणार, न्यायालयीन कोठडीत वाढ

'आमचा संघर्ष संपला नाही, आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये...', भाजपाला घेरत नाना पटोलेंचा मोठा दावा

पेपर लीक प्रकरणाबद्दल राज्यसभामध्ये काय बोलले पीएम मोदी

मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणणार

सर्व पहा

नवीन

हाथरस: 'मी तिथे पोहोचलो, तेव्हा जागोजागी मृतदेह पडले होते', चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणाहून ग्राऊंड रिपोर्ट

उत्तर प्रदेश पोलीस दलात शिपाई असणारे सूरजपाल जाटव कसे बनले 'भोले बाबा'? त्यांच्या कार्यक्रमात कशी झाली चेंगराचेंगरी?

'लाडकी बहिण योजना' लाभ करिता कागदपत्र जमा करण्यासाठी गेलेल्या महिलेकडून घेतले पैसे

मुंबईतील रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांचा ताबा, मुंबई उच्च न्यायालयाने BMC ला फटकारले

मतदानपूर्वी बोलले ब्रिटिश पीएम ऋषि सुनक, म्हणाले-असे काहीही करू नका ज्यामुळे पश्चाताप होईल

पुढील लेख
Show comments