Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, पुराचे संकट

Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (13:28 IST)
जळगाव जिल्ह्यात पावसाने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली आहे.जळगावच्या भडगाव,पाचोरा आणि चाळीसगावामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून,रस्ते,घरं,दुकानं पाण्याखाली गेली आहे. रस्त्यावरील  वाहने पाण्याखाली बुडाले आहे.चाळीसगाव अहमदनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.सध्या जळगाव जिल्ह्यात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. 

चाळीसगाव मध्ये पुराचे पाणी गिरणा न तितूर नदीत मिळाल्याने जवळच्या गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पाऊस असल्यामुळे इथे वीजपुरवठा खंडित झाला आहे.अनेक गावांशी सम्पर्क तुटला आहे.प्रशासनाकडून उपाययोजनेला सुरुवात झाली आहे.चाळीसगावाततील कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.चाळीसगावात धरण पूर्णपणे तुडुंब भरले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.त्यामुळे त्या काठावरील गावांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने पुढील 3 -4 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील सांगण्यात आले आहे. सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढल्यामुळे औरंगाबाद मध्ये दरड कोसळली असून औरंगाबादातील पाझर तलाव फुटला आहे.    
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments