Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी आज मतदान

Webdunia
महाराष्ट्रातील असलेल्या मुंबई सोबत महत्वाच्या 10 महापालिका आणि 10 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान होणार आहे. निवडणूक आयोगासह पोलिस, प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीला लागले आहेत. मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांमध्ये 1268 जागांसाठी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. तर शहरांमध्ये 1 कोटी 95 लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडणार आहे.
 
मतदानासंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे  यामध्ये 21 फेब्रुवारीला (दुसरा टप्पा) होणाऱ्या 10 जिल्हा परिषदांतील 654 जागांसाठी 2956 उमेदवार रिंगणात उभे आहेत. तर 21 फेब्रुवारीला (दुसरा टप्पा) होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 1 कोटी 80 लाख मतदार मतदान करणार आहेत.  तर राज्यातील पंचायत समित्यांच्या 1288 जागांवर 5167 उमेदवारउभे आहेत. 
 
यावेळी मतदान होत असताना 22 हजारपेक्षा जास्त पोलिंग स्टेशन, दीड लाख कर्मचारी आणि जवळपास तितकेच पोलिस असणार आहेत. दहा महानगरपालिकांसाठी 1268 जागा, 9208 उमेदवार रिंगणात, 1.95 कोटी मतदार आहेत. तर  21 हजार पोलिंग स्टेशन. 1 लाख 30 हजार कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये 3 हजार 461 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार तर  1 हजार 754 मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांचे उमेदवार आणि 2 हजार 663 अपक्ष उमेदवार आहेत. 
 
एक नजर उभे असलेल्या उमेदवार संख्येवर : 
महापालिका (जागा) : उमेदवार रिंगणात
 
मुंबई (227)- 2,275, ठाणे (131)- 805, उल्हासनगर (78)- 479, पुणे (162)-1,090, पिंपरी-चिंचवड (128)- 774, सोलापूर (102)- 623,  नाशिक (122)- 821,अकोला (80)- 579,
 
अमरावती (87)- 627, नागपूर (151)- 1,135  एकूण (1,268)- 9,208 उमेदवार उभे आहेत.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments