Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'एल्गार परिषद चालते, शिवजयंतीला विरोध का?'

BJP spokesperson and MLA Ram Kadam has demanded that Tughlaq s decision be reversed.
Webdunia
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (21:25 IST)
महाराष्ट्रात सातत्याने हिंदूंचा अपमान होत आहे. तुम्ही एल्गार परिषदेला परवानगी देता, रेल्वे-बसमधील गर्दी चालते, शेतकरी मोर्चाला परवानगी देता. मात्र शिवजयंतीला परवानगी नाही? हा तुघलकी निर्णय मागे घ्या, अशी मागणी भाजप प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केली आहे.
 
सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, शिवजयंती कार्यक्रमात 10 पेक्षा अधिक व्यक्तींनी सहभागी होऊ नये, परवानगीपेक्षा जास्त व्यक्ती सहभागी झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं आहे. शिवसेना सरकारने हे फर्मान मागं घ्यावं, असं राम कदम म्हणाले.
 
ज्यांच्या नावाने पक्ष चालवला आणि राज्यात सत्ता स्थापन केली, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे, हे कुठले तुमचे तुघलकी निर्णय? आम्ही राज्यात थाटामाटात शिवजयंती साजरी करू, तुमचा निर्णय मागे घ्या, अशी टीका घणाघात राम कदम यांनी राज्य सरकारवर केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments