Festival Posters

मुदत संपलेल्या रुग्णवाहिका कायम

Webdunia
गुरूवार, 1 फेब्रुवारी 2024 (09:14 IST)
रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात येणा-या ‘१०८’च्या सेवेला तिस-यांदा मुदतवाढ देण्याचा अजब निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच या मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या रुग्णवाहिकांचे आयुष्य संपलेले असतानाच व त्याबाबतचा अहवालही आयुक्तालयातर्फे देण्यात आल्यानंतरदेखील ही मुदतवाढ देण्यात येत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्य म्हणजे, ही रुग्णवाहिका सेवेचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारास जोधपूर आणि नोएडा येथे काळ्या यादीत टाकले असतानाही ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
राज्य सरकारतर्फे रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्याकरिता १०८ या उपक्रमाला २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार राज्यात एकूण ‘१०८’ प्रकल्पांतर्गत ९३७ रुग्णवाहिकांची सेवा देण्यात येत आहे. त्यात २३३ अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्टिंग रुग्णवाहिका आणि ७०४ बेसिक लाईफ रुग्णवाहिका यांची सेवा राबविण्यासाठी मे. बी. व्ही. जी. इंडिया या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती.
 
पाच वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर ३१ जानेवारी २०१९ रोजी या कंत्राटदाराचे कंत्राट संपल्यानंतर तातडीची बाब म्हणून १ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी एक समितीही नेमण्यात आली होती. त्यानंतर समितीने केलेल्या शिफारशीनुसार आणि मंत्रिमंडळाने दिलेल्या अंतिम मान्यतेनंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यात रेडी रेकनर दरांमध्ये वाढ होणार नाही

अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा, ४५ प्रमुख राजकारणी आणि डॉक्टरांची नावे समोर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

हत्तीरोग निर्मूलनासाठी राज्यात त्रिऔषधोपचार मोहीम तीव्र

१ एप्रिलपासून हे १० नियम बदलणार आहेत

शिवसेनेच्या चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलली

पुढील लेख
Show comments