Festival Posters

पुतळा वादावर फडणवीसांचा नौदलावर ठपका

Webdunia
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (13:14 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्यावर राजकारण तापले आहे. विरोधक पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करत आहे. त्यांचा राजीनामा मागत आहे.या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला माफी मागितली आहे. 

या प्रकरणी बनावट सल्लागाराला अटक केली आहे. या प्रकरणावर महायुतीच्या नेत्यांची वक्तव्ये बाहेर येत आहे. त्यात एकवाक्यता नाही. या वर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा पुतळा नौदलाने बांधला आहे राज्य सरकारने नव्हे.जोरदार वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर गदारोळ झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली असून लवकरच मोठा पुतळा उभारणार अशी घोषणा केली. 

या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदलाने बांधल्याचे म्हटले आहे.पुतळा उभारणीसाठी जबाबदार व्यक्तीने वाऱ्याचा वेग आणि दर्जा या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले असावे.सागरी वाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे पुतळ्यात वापरले जाणारे लोह गंजण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.  

या वर प्रतिक्रिया देतांना उपमुख्यमंत्री यांनी कोणतेही वक्तव्य दिले नव्हते मात्र त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो असे जाहीर सभेत म्हटले. लवकरात लवकर त्या ठिकाणी महाराजांचा नवीन पुतळा बसवला जाईल असे म्हणाले. घडलेली घटना चुकीची असून त्यावर कारवाई केली जाईल. 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments