suvichar

आता क्लास चालकांकडून खंडणी, चौघांना पोलीस कोठडी

Webdunia
खाजगी शिकवणी संचालकाकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाने चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लातूर येथे  न्यायमुर्ती वाय. एच. शेख यांच्या दालनामध्ये चार आरोपींना सुनावनीसाठी हजर करण्यात आले होते. फरार असलेले दोघेजण स्वत:हून काल पोलिस चौकीत हजर झाले असून त्यांना पोलिसांनी त्यांना अटक केली.

शकील शेख, महावीर तुकाराम कांबळे, गौस शेख अशी त्यांची नावे आहेत. ते शिवाजीनगर पोलिस चौकीत काल सायंकाळी हजर झाले. या दोघांसह कॉंग्रेस नगरसेवक सचिन मस्के अशा चौघांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. अद्याप तीन जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

विजयसिंह हर्षप्रतापसिंह परिहार आणि राजीवकुमार रमाकांत तिवारी हे दोघेही अध्ययन नावाने सिग्नल कॅम्प भागात शिकवणी चालवतात. त्यांना २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्याचा गुन्हा सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार खंडणीचा नसून हा वैयक्तीक व्यवहाराचं प्रकरण असल्याचा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. पोलिसांच्या मागणीनुसार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात वापरण्यात आलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments