Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता क्लास चालकांकडून खंडणी, चौघांना पोलीस कोठडी

maharashtra news
Webdunia
खाजगी शिकवणी संचालकाकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाने चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लातूर येथे  न्यायमुर्ती वाय. एच. शेख यांच्या दालनामध्ये चार आरोपींना सुनावनीसाठी हजर करण्यात आले होते. फरार असलेले दोघेजण स्वत:हून काल पोलिस चौकीत हजर झाले असून त्यांना पोलिसांनी त्यांना अटक केली.

शकील शेख, महावीर तुकाराम कांबळे, गौस शेख अशी त्यांची नावे आहेत. ते शिवाजीनगर पोलिस चौकीत काल सायंकाळी हजर झाले. या दोघांसह कॉंग्रेस नगरसेवक सचिन मस्के अशा चौघांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. अद्याप तीन जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

विजयसिंह हर्षप्रतापसिंह परिहार आणि राजीवकुमार रमाकांत तिवारी हे दोघेही अध्ययन नावाने सिग्नल कॅम्प भागात शिकवणी चालवतात. त्यांना २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्याचा गुन्हा सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार खंडणीचा नसून हा वैयक्तीक व्यवहाराचं प्रकरण असल्याचा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. पोलिसांच्या मागणीनुसार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात वापरण्यात आलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mumbai First Amrit Bharat Train अमृत भारत ट्रेन कोणत्या मार्गांवर धावेल जाणून घ्या

५२ वर्षीय महिला २५ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, कुटुंब सोडून लग्न केले!

What Is Kalma: कलमा म्हणजे काय? पर्यटकांना हे वाचण्याचा आदेश दिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला

मोठी कारवाई: पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल आणि आसिफ यांचे घर स्फोटात जमीनदोस्त

LIVE: काश्मीरमधून 500 हून अधिक पर्यटक महाराष्ट्रात परतले

पुढील लेख
Show comments