Marathi Biodata Maker

समाजकंटक शेतकऱ्यांच्या जीवावर दुष्काळात काढलेले सोयाबीन जाळून टाकले

Webdunia
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (08:00 IST)
लातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत कसंबसं पीक काढून शेतकर्‍यांनी रचलेली सोयाबीनची गंजच पेटवून देण्याचा प्रताप पानचिंचोली गावात घडला आहे. पानचिंचोलीत ऋषी होळीकर या तरुण शेतकर्‍याने तीन एकरमध्ये सोयाबीनची लागवड केली होती. फलधारणा होऊन पीक परिपक्व होईपर्यंत त्यांनी प्रतिक्षा केली. पण मळणी यंत्र न मिळाल्याने त्यांनी या सोयाबीनची गंज रचून ठेवली होती. मळणी यंत्र दोन दिवसांनी मिळायचे होते. काल दसरा असल्याने सगळेजण गावात होते. ही संधी साधून अज्ञातांनी ही गंज पेटवून दिली. ही गंज तशीच राहिली असती तर किमान ३० क्विंटल सोयाबीन निघाले असते. त्यातून या शेतकर्‍य़ास एक ते दीड लाख रुपये मिळाले असते. एकीकडून आस्मानी संकट मारते, दुसरीकडून सुलतानी संकट हातात तलवार घेऊन तयारच असते, आता गावातलेच शत्रू आपल्या विकृत समाधानासाठी असे प्रयत्न करीत आहेत. 
 
या प्रकरणी तलाठ्याचा पंचनामा झाला असून आता पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

LIVE: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले

Maharashtra kesari 2026 : पुण्यात महाराष्ट्र केसरी साठी 1500 मल्ल भिडणार

इराण-इस्रायल युद्धामुळे हापूस आंबा निर्यात धोक्यात, कोकणातील शेतकऱ्यांची चिंता

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, जनहित याचिका दाखल

सोलापुरात एसआरपीएफ जवानाची आत्महत्या, पत्नीच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments