Festival Posters

समाजकंटक शेतकऱ्यांच्या जीवावर दुष्काळात काढलेले सोयाबीन जाळून टाकले

Webdunia
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (08:00 IST)
लातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत कसंबसं पीक काढून शेतकर्‍यांनी रचलेली सोयाबीनची गंजच पेटवून देण्याचा प्रताप पानचिंचोली गावात घडला आहे. पानचिंचोलीत ऋषी होळीकर या तरुण शेतकर्‍याने तीन एकरमध्ये सोयाबीनची लागवड केली होती. फलधारणा होऊन पीक परिपक्व होईपर्यंत त्यांनी प्रतिक्षा केली. पण मळणी यंत्र न मिळाल्याने त्यांनी या सोयाबीनची गंज रचून ठेवली होती. मळणी यंत्र दोन दिवसांनी मिळायचे होते. काल दसरा असल्याने सगळेजण गावात होते. ही संधी साधून अज्ञातांनी ही गंज पेटवून दिली. ही गंज तशीच राहिली असती तर किमान ३० क्विंटल सोयाबीन निघाले असते. त्यातून या शेतकर्‍य़ास एक ते दीड लाख रुपये मिळाले असते. एकीकडून आस्मानी संकट मारते, दुसरीकडून सुलतानी संकट हातात तलवार घेऊन तयारच असते, आता गावातलेच शत्रू आपल्या विकृत समाधानासाठी असे प्रयत्न करीत आहेत. 
 
या प्रकरणी तलाठ्याचा पंचनामा झाला असून आता पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नवी मुंबईत भारत-आफ्रिका आंतरराष्ट्रीय व्यवसाय केंद्र उभारले जाणार

सुपर चेस क्लासिकच्या सलामीच्या सामन्यात प्रज्ञानंद फिरौजाविरुद्ध खेळणार, गुकेशने माघार घेतली

नवी मुंबईत भारत-आफ्रिका आंतरराष्ट्रीय व्यवसाय केंद्र उभारले जाणार, सिडको आणि एआयईएफ यांच्यात मोठा करार

IMDचा मुसळधार पावसाचा इशारा: या राज्यांसाठी 'Heavy Rain Alert '; २१ मे पर्यंत अशीच हवामान स्थिती कायम राहणार

चाळीसगाव येथे लसीकरणानंतर अडीच महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments