Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : पाटील

Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (20:18 IST)
Farmers will not be left in the wind: Patil राज्य सरकार शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल; पण विरोधक आपल्याला शेतकऱ्यांचा खूप पुळका आहे, असे दाखवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला उपदेश देण्याचे कार्य करीत आहेत, ते थांबविण्याचे आवाहन राज्याचे पुनर्वसन व मदतकार्य मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.
 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सांगितले, की उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, त्यावेळी त्यांनी कसे दौरे रद्द केले व तसेच दौरा कशा पद्धतीने केला, हे फार जवळून बघितले आहे. राज्यातील तर जनतेला हे माहीतच आहे, की त्यांनी राज्यात कशाप्रकारे कार्यक्रमांना हजेरी लावली.
 
त्यामुळे त्यावर त्यांना बोलण्याचा आता कोणताही अधिकार नाही, असे स्पष्ट करून पाटील पुढे म्हणाले, की जरी मुख्यमंत्री इतर राज्यांच्या प्रचार दौऱ्यांमध्ये असले तरीही त्यांनी अधिकार दिलेले मंत्री हे काम करीत आहेत. राज्य सरकारमधील अधिकारी काम करीत आहेत, मग मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्यात काय अर्थ आहे? आज त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे पालन करूनच आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे विरोधकांनी उगाच आपणच काम करतो, असा बाऊ करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

सर्व पहा

नवीन

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

महाराष्ट्र: गुप्त धनाचा लोभ, नरबळी देण्यासाठी चालली होती अघोरी पूजा

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

Maharashtra: अंगणवाडी मध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या पॅकेटात निघाला मेलेला साप

पुढील लेख
Show comments