Festival Posters

भरवस्तीती फटका दुकानांना आग २०० दुकाने जळाली

Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (14:50 IST)
औरंगाबादमध्ये फटाका मार्केटला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे २००  फटाक्यांची दुकानं जळून भस्मसात झाली आहेत. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र या भीषण आगीत  सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. प्राथमिक अहवालानुसार या भीषण  आगीत दीड ते दोन कोटींचं नुकसान झालं आहे.. 
 
 शहरातील गजबजलेल्या मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद मैदानावर दरवर्षीप्रमाणे फटाके मार्केट भरवण्यात येतो. यंदा मोठ्या उत्साहाने फटाका मार्केट स्टॉल सजवण्यात आले. मात्र, औरंगाबादकरांच्या दिवाळीला गालबोट लागले. फटाका मार्केटला अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. अवघ्या काही तासांत २००  फटाक्यांची दुकानं जळून भस्मसात झाली आहेत . या आगीत अनेक वाहनं आगीच्या भस्मसात झाली आहे. परिसरात धुराचे मोठे लोट दूरहुन दिसत होते. गंभीर बाब म्हणजे निवासी परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची माहिती अजूनही अस्पष्ट आहे. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई विमानतळावर बॉम्बच्या खोट्या धमकीमुळे घबराट

यमुना एक्सप्रेसवेवर बस यमुना एक्सप्रेसवेवर बसला आग लागल्याने घबराट पसरली; ४८ प्रवासी थोडक्यात बचावले

उत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राच्या इंजिनची चाचणी केली

उद्धव गटातील ४ नगरसेवक शिंदे गटात सामील

आर्यना सबालेन्काने अंतिम फेरीत कोको गॉफला हरवून मियामी ओपनचे विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments