Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग

Webdunia
शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (17:39 IST)
गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान फटाक्यांमुळे व कचऱ्याला आग लागून नऊ घटना घडल्या होत्या, तर यंदा ते प्रमाण १७वर पोहोचले आहे. फटाक्यांमुळे लागलेल्या या आगींवर अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ नियंत्रण मिळवित मोठी हानी टाळली आहे. तर, ठाणे शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे सर्वाधिक आग लागल्याच्या घटनांची नोंद या विभागाकडे करण्यात आली आहे.

यावर्षी ठाणे शहरात दिवाळीदरम्यान म्हणजेच ६ ते ९ नोव्हेंबरपर्यंत फटाके आणि फटाक्यांच्या कचऱ्यामुळे आग लागलेल्या घटना या लोकमान्यनगर, कळवा, वागळे, वर्तकनगर, माजीवाडा-मानपाडा, दिवा, उथळसर, नौपाडा-कोपरी परिसरात घडल्या आहेत. या चार ते पाच दिवसांत शॉट सर्किटमुळे, फटाके, कचरा अशा कारणांमुळे एकूण ५२ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. तर, गेल्या वर्षी दिवाळीच्या पाच दिवसांत २० ठिकाणी आग लागल्याची नोंद आहे. फटाक्यांमुळे तसेच शॉट सर्किटमुळे जरी आग लागल्याच्या घटना असल्या तरी यावर्षी या घटना दुप्पट वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments