Festival Posters

फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग

Webdunia
शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (17:39 IST)
गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान फटाक्यांमुळे व कचऱ्याला आग लागून नऊ घटना घडल्या होत्या, तर यंदा ते प्रमाण १७वर पोहोचले आहे. फटाक्यांमुळे लागलेल्या या आगींवर अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ नियंत्रण मिळवित मोठी हानी टाळली आहे. तर, ठाणे शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे सर्वाधिक आग लागल्याच्या घटनांची नोंद या विभागाकडे करण्यात आली आहे.

यावर्षी ठाणे शहरात दिवाळीदरम्यान म्हणजेच ६ ते ९ नोव्हेंबरपर्यंत फटाके आणि फटाक्यांच्या कचऱ्यामुळे आग लागलेल्या घटना या लोकमान्यनगर, कळवा, वागळे, वर्तकनगर, माजीवाडा-मानपाडा, दिवा, उथळसर, नौपाडा-कोपरी परिसरात घडल्या आहेत. या चार ते पाच दिवसांत शॉट सर्किटमुळे, फटाके, कचरा अशा कारणांमुळे एकूण ५२ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. तर, गेल्या वर्षी दिवाळीच्या पाच दिवसांत २० ठिकाणी आग लागल्याची नोंद आहे. फटाक्यांमुळे तसेच शॉट सर्किटमुळे जरी आग लागल्याच्या घटना असल्या तरी यावर्षी या घटना दुप्पट वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बिनविरोध विजय मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान

LIVE: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

आदर्श नगरमधील इमारतीला आग, एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

वैभवच्या १० षटकारांच्या स्फोटक खेळीमुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय

इराणमधील संकटामुळे, भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी एक सल्लागार जारी केला

पुढील लेख
Show comments