Marathi Biodata Maker

उमदीत टोळी युद्ध, दोघांचा खून, एक चिंताजनक

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (15:02 IST)
सांगलीतील जत तालुक्याच्या उमदी येथे दोन टोळी युद्धाचा मंगळवारी रात्री भडका उडाला. या भडक्याने दोन तरुणांचा बळी घेतला आहे. दोघा तरुणांना धारधार शत्राने वार करून निर्घृण खून करण्यात आले. तर एक जण गंभीर जखमी असून त्याचीही प्रकृती चिंताजनक बनली आहे. उमदी पंढरपूर मार्गावर हा थरार घडला आहे. या दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला आहे. या प्रकरणी संशयित 12 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
मदगोंडा नागा बगली (वय 24) व संतोष राजू माळी (वय 23) रा.उमदी अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर प्रकाश मल्लिकार्जून परगोंड (वय 22) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस अधिक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली आहे. उमदी येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील वादातून आणि पूर्वैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जत येथील एका टोळीचा म्होरक्या, उमदी येथील सहकारी तसेच उमदी येथील एक टोळी यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. त्याची किनार या घटनेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

15 जानेवारी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्यातील कर्मचाऱ्यांना ‘पगारी सुट्टी

पुढील लेख
Show comments