Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येथे 28 दिवसांपासून ग्रामस्थ पाण्याविना, नागरिकांनी सोडलं गाव

Webdunia
गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (15:44 IST)
अमरावती- अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असून त्याशिवाय जगणे शक्य नाही. मात्र विदर्भातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे पिण्याच्या पाण्याअभावी गावकऱ्यांना गाव सोडावे लागल्याचे कळते. 
 
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरपूर गावातही ही घटना घडली. या घटनेने पुरोगामी महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. येथे गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने त्यांनी गाव सोडले. या सर्व ग्रामस्थांनी गावाच्या वेशीजवळ धरणे सुरू केले आहे. बुधवारी रात्रीपासून गावावर बहिष्कार टाकून कडाक्याच्या थंडीत गावाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. पाणी मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
 
येथे गेल्या 28 दिवसांपासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. गावच्या सरपंचाने हे कृत्य जाणीवपूर्वक केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी करत आहे. ग्रामपंचायतीने प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेल्या 28 दिवसांपासून पाणीपुरवठा केला नसल्याचा आरोप होत असून पाण्याच्या मागणीसाठी गावातील लोक रात्रीपासून कुटुंबासह गावाबाहेरील विहिरीजवळ ठाण मांडून आहेत.
 
आपल्या गावात पाण्याची ही समस्या गेल्या 20 वर्षांपासून असल्याचंही ग्रामस्थांनी म्हटलं आहे. त्यातच आता ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. 28 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर गाव सोडण्याचा निर्णय घेतला. या गावातील अनेक नागरिक आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत विहिरीजवळ बसले आहेत. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments