Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा एकदा मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज

Webdunia
शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (08:02 IST)
येत्या दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम अशा स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवला आहे. त्यासोबतच विदर्भातही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवार ९ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान हा पाऊस आणि गारपीटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. या कालावधीत काही जिल्ह्यांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
शनिवार ते रविवार या कालावधीत राज्यात चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया याठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी हलका ते मध्य स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी उकाड्याचा पारा चढलेला असतानाच या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी उकाड्यापासून काही कालावधीसाठी दिलासा मिळणार आहे.

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments