Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींच्या सभेत तिला मिळाले नाही पाणी सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू

Webdunia
धक्कादायक गोष्ट घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना  घडली आहे. बाबूराव गुटेवार (१२) रा. शिवाजी वार्ड पांढरकवडा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
 
क्षितीजा ही यवतमाळ येथील  पांढरकवडा  जिल्हा परिषद विद्यालयाची सातव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. पांढरकवडा येथे शनिवार १६ फेब्रुवारी रोजी स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या मेळाव्यासाठी शिवाजी वार्डातील काही महिला सकाळी ८ वाजताच आॅटोरिक्षाने गेल्या होत्या. सकाळी ११ वाजताची सभा असल्याने उन्ह वाढले होते.

जेथे  मेळावा होता त्या  ठिकाणी पाण्याची कुठलीच व्यवस्था नव्हती, त्यामुळे अनेक महिलांचा जीव कासावीस झाला, तहानेने  घसा कोरडा पडला, सुरक्षेच्या कारणावरून ‘या जागीच बसून रहा’ असे  पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले होते.  वेळीच पाणी न मिळाल्याने घरी आल्यानंतर क्षितिजाची प्रकृती खालावली. तिला आधी पांढरकवड्यातील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळला हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता पाण्याअभावी तिचे अवयव निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बुधवारी सकाळी क्षितीजाची प्राणज्योत मालवली. पांढरकवडा येथे दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

GT vs RR Playing-11: आयपीएल सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांसमोर, प्लेइंग 11 जाणून घ्या

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले जाती किंवा धर्मामुळे लोकांना घरे न मिळणे निराशाजनक आहे, भेदभाव संपला पाहिजे

LIVE: मनसेने उत्तर भारतीयांना हाकलून लावण्याची धमकी दिली

नणंद भावजयीचे कपडे उतरवून व्हिडिओ बनवला, रेवाडीत ७ नराधमांचे लज्जास्पद कृत्य

पुढील लेख
Show comments