Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वरूण सरदेसाई यांच्यावर गुन्हा दाखल झाला का?, मनसेचा सवाल

Webdunia
बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (08:19 IST)
दहीहंडी उत्सव साजरा केल्याबद्दल आमच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची कारवाई केली जाते. गर्दी करू नका असे मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात, मात्र त्यांच्या पक्षातील लोकांना सांगत नाही. नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? सरदेसाई मुख्यमंत्र्यांचा भाचा आहे म्हणून त्याला सुट मिळते का?असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी मंगळवारी केला करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले आहेत.अशावेळी दहीहंडी साजरी करणारे मनसे नेते बाळा नांदगावकरा यांच्यासह मनसेच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काही सवाल केले आहेत.
 
राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दहीहंडी ठिकठिकाणी साजरी केली.मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात, मग स्वत:च्याच पक्षातील लोकांना घरी बसायला का सांगत नाहीत? आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितले नाही? वरुण सरदेसाईवर गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? अशी विचारणा त्यांनी केली.

संबंधित माहिती

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

पुढील लेख
Show comments