Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्यांना माणसांची पारखच नव्हती, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला

Webdunia
सोमवार, 30 जानेवारी 2023 (08:04 IST)
कोरोना वाढला की त्याचा परिणाम महाराष्ट्रावर व्हायचा. मात्र, आम्ही आलो आणि सर्व निर्बंध हटविले. जे २०१९ मध्ये व्हायला पाहिजे होते ते आम्ही सहा महिन्यांपूर्वी केले. शिवसेना -भाजप युती ही काळाची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. भोसरी येथे इंद्रायणी थडी जत्रेचा रविवारी (दि. २९) समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
 
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दोन -अडीच वर्षे सगळेच दबकून बसले होते. मात्र, आम्ही सर्व निर्बंध हटविल्याने सगळं मोठ्या उत्साहात सुरू झाले. त्यापूर्वी इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, असे होते. मात्र, आता चिंता करू नका. तुमच्या केसालाही हात लावण्याची कोणी हिम्मत करणार नाही. राज्यातील हे डबल इंजिजनच सरकार वेगाने धावतंय. या सहा महिन्यांत सर्व घटकांसाठी निर्णय घेण्याचा आम्ही धडाका लावला आहे. कमी वेळात आम्हाला जास्त काम करायचे आहे. या सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करणार आहे.
 
भोसरीला पैलवानांचा इतिहास -
पैलवान काहीही करून शकतात. भोसरीला पैलवानांचा इतिहास आहे. पैलवान महेश लांडगे हे उमेदवारी मिळावी म्हणून माझ्याकडे आले होते. त्यावेळी मी पक्षाकडे शब्द टाकला होता. मात्र, त्यांना माणसांची पारखच नव्हती, असे म्हणून नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments