Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तो पर्यत निवडणुका होऊ देणार नाही : विजय वडेट्टीवार

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (09:23 IST)
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजातील नेते नाराज झालेले आहेत. ओबीसीचं आरक्षण जाण्यास राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरक्षणांच्या मुद्द्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी इशारा दिला आहे. 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुकाच होऊ नये, याविषयी राज्य सरकार सकारात्मक आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याच्या चर्चेमध्ये राज्य सरकार सकारात्मक आहे. "ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कोणाचा कितीही दबाव आला, तरी या निवडणुका होऊ देणार नाही. यासंदर्भातील भाजपचं आंदोलन म्हणजे वरातीमागून घोडे असंच आहे. कारण, याबाबत मागेच चर्चा झालेली आहे", अशी प्रतिक्रिया कॅबिनेटमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 
 
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागवर्गियांचं (ओबीसी) संपुष्टात आलं आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका २९ मे २०२१ रोजी सर्वोच्चय न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्यात चर्चेला उधाण आले आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments