Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाळा सुरू राहणार का बंद होणार आरोग्यमंत्री टोपें यांनी दिले स्पष्टीकरण

Webdunia
शनिवार, 25 डिसेंबर 2021 (21:54 IST)
मुंबईसह राज्यभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शाळांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने सरकार खबरदारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करणार की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील शाळा पूर्ववतच सुरू राहतील, शाळा बंद
करण्याबाबत तूर्ततरी कुठलाही नवीन निर्णय घेण्यात येणार नाही, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं.
शाळांबाबतही सरकार काय निर्णय घेणार असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांना उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी शाळांबाबत तूर्तास तरी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही स्पष्ट केले आहे.
त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या शाळा सुरु आहेत, तशाच त्या सुरु राहतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.राज्यात कोरोनाला उतरती कळ लागल्यानंतर ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढीस लागला आहे.
या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही नियम कठोर केले आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक दिवस बंद असलेल्या शाळा नुकत्याच काही भागात सुरु करण्यात आल्या. मात्र ओमायक्रॉनच्या संकटामुळे आता पुन्हा सुरु झालेल्या
शाळांवर पुन्हा एकदा कुलूपबंदचे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज्य सरकारने अशा शक्यतेचे खंडन केले आहे.

संबंधित माहिती

SCO vs AUS :ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील T20 विश्वचषक सामना रविवारी, प्लेइंग 11 जाणून घ्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा खर्गे यांना सल्ला म्हणाले-

मुंबईत बायकोच्या त्रासाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

Porsche Car Crash: मुंबई उच्च न्यायालयाचा पुणे पोर्श कार अपघातातील आरोपींना सोडण्यास नकार

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात मृतांची संख्या आठ वर पोहोचली

INDIA vs CANADA : ओल्या मैदानामुळे भारत-कॅनडा सामना रद्द

18 जून रोजी वाराणसीमध्ये पीएम मोदी शेतकऱ्यांसाठी 20 हजार कोटी रुपये जारी करणार

नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत आठ नक्षलवाद्यांना ठार मारले,एक जवान शहीद, दोन जवान जखमी

लघवीचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? त्याबद्दल चिंता कधी करायला हवी? वाचा

कामाचं नाटक करत, माऊस खेळवत राहाणाऱ्यांची बँकेने केली हकालपट्टी

पुढील लेख