Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता १ ऑगस्ट ऐवजी या तारखेला

Webdunia
सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (08:31 IST)
महाराष्ट्रातील अभूतपूर्वी राजकीय आणि सत्ता संघर्षाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एस व्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे होत आहे. ही सुनावणी १ ऑगस्ट रोजी होण्याचे प्रस्तावित होते. मात्र, आता ही सुनावणी १ ऑगस्ट ऐवजी ३ ऑगस्टला होणार आहे.
 
शिवसेना पक्षामध्ये मोठी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तब्बल ४० आमदारांनी बंड केले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पायऊतार होऊन शिंदे आणि भाजप यांचे नवे सरकार स्थापन झाले. शिंदे यांनी विधानसभेत नवा गट स्थापन केला. त्यापाठोपाठ १२ खासदारांनाही फोडले. त्यामुळे लोकसभेतही नवा गट स्थान करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगत निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. हे सर्व शिंदे गटाकडून होत असताना या सर्व बाबींना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने सर्वोच्च नायायलयात दाद मागितली आहे. तसेच, शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या निलंबन कारवाईवरही सर्वोच्च न्यायालयात शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत शिंदे, शिवसेना आणि राज्यपाल असा तिघांच्यावतीने घमासान युक्तीवाद करण्यात आला. हा हे प्रकरण संविधानिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असल्याचे मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले होते. त्यामुळेही या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments