Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परतीचा जीवघेणा पाऊस वीज पडून ११ नागरिकांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:56 IST)

राज्यात   अनेक  ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला आहे. मात्र हा पाऊस जीवघेणा ठरला आहे. यामध्ये वीज पडून काल दिवसभरात  शुकवार  अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी मुंबई उपनगरं, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे आणि  विदर्भाच्या काही भागात परतीच्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून  आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी दैना झाली होती.मात्र या पावसात अनेकांना  जीवही गमवावा लागला आहे.

मृत्यू पाहता उआम्ध्ये प्रथम सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झालाआहे, तर वीज इतकी भयानक पडली की  पाच जण जखमी झाले. पालघरमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू, धुळ्यात तीन महिला, जालन्यात एक आणि मुंबईत एकाचा वीज पडून बळी गेला आहे. तर मुसळधार पाऊस इतका भयानक होता की  घरांवरची छप्पर उडाली आहेत. तर कापणीला आलेल्या  पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणं जनावरंही दगावली आहेत.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments